कुणाच्यातरी कविता वाचताना
त्यात दोन ओळी आपल्याही असाव्यात
त्या कविता वाचता वाचता
तिझा चेहरा डोळ्यासमोर दिसावा ...
मग आपण सुद्धा कवी होऊ पहातो
जे मनात येईल ते शब्दात उतरवू पाहतो
इतर कवींपेक्षा आपल्या कवितेत असते फक्त ती
कविता संपल्यावर राहतो तो फक्त एकटा मी
मग काय मनात ती , ध्यानात ती
हेच काय स्वप्नात सुद्धा तीच
पण स्वप्नातून बाहेर आलोकी
राहतो तो फक्त एकटा मी ....
सकाळी उठल्यावर एकच हुरहूर
तिला जाऊन भेटण्याची
स्वप्नातील सर्व काही तिला सागण्याची
ती समोर आल्यावर वेड्या सारख तिला पाहण्याची
ती समोर असताना अतिशय आनंद
तिझ्या मिठीतला तो मोहक सुगंध
मग स्वप्न सागायचं राहूनच जात
कारण,
तिझ्या बरोबरच्या काही क्षणासाठी मी असतो धुंध
धुंध या आमुच्या जगात असच रहावस वाटत
असच तिझ्या सोबत पूर्ण आयुष्य जगावस वाटत
तिझ्या सहवासतील काही क्षण अमूल्य आहेत म्हणूनच ........
तिला कायमची आपल्या मिठीत सामाऊन घ्यावस वाटत...